६ जून रोजी आदिवासी एकजूट संघटनेनी वसई तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण व बिऱ्हाडी आंदोलन करण्यात आले होते.त्यावेळी आंदोलना मध्ये संघटनेची मागणी क्रमांक 13 वी होती. कि अर्नाळा ग्रामपंचायत ने काही लोकांना घरपट्टी आकारणी केली आहे.
तर काही लोकांना करत नाही. जाणून बुजूण घरपट्टी करत नाही.तरी त्या घरांना घरपट्टी आकारणी करावी म्हणून संघटनेनी उपोषण व आंदोलन केले होते. शेवटी संघटनेच्या आंदोलना पुढे तर अर्नाळा ग्रामपंचायतीला झुकवाव लागल .त्यावेळी मात्र ग्रामपंचायतीने संघटनेला लेखी आश्वासन दिल होत .कि शासन निर्णया नुसार ग्रामपंचायतीने काही नागरीकांना कर आकारणी केली आहे.तर त्याच शासन निर्णया प्रमाणे आपणाला देखील ग्रामपंचायत कर आकारणी करण्यास तयार आहे.आता मात्र ग्रामपंचाय कर आकारणी करण्यास टाळा टाळ करत आहे .
ग्रामपंचायने दिलेल्या आश्वासन पत्रावर ग्रामसेवक श्री पंकज संख्खे सरपंच श्रीमती हेमलता बाळशी ह्यानची दोघानच्या सही शिक्का ने संघटनेला आश्वासन पत्र दिले होते .
लेखी आश्वासन देउन देखील संघटनेची फसवणुक केल्या मुळे आदिवासी एकजूट संघटनेचे संस्थांपक / अध्यक्ष कु .शेरू वाघ तसेच सचिव सौ .पुनम भुयाळ व ईतर आदिवासी एकजूट संघटनेचे कार्यकर्ते यांनी वसई गटविकास अधीकारी व तहसिलदार यांना लेखी तक्रारी निवेदन ग्रामपंचायत विरुद्ध दिनांक 8 जूलै रोजी देण्यात आले व निवेदना मध्ये मुख्य मागणी करण्यात आली अर्नाळा ग्रामपंचायतीने संघटनेची फसवणुक केली आहे.तरी ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामसेवक यांना निलंबीत व कारवाई करण्यात यावी.तसे संघटनेला ८ दिवसात लेखी पत्रा द्वारे कळवावे ..अन्यथा संघटना आंदोलन करेल.
असा ईशारा आदिवासी एकजूट संघटनेचे संस्थांपक/ अध्यक्ष कु.शेरू वाघ व ईतर कार्यकर्त्यांनी दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *