प्रतिनिधी : आज पुन्हा वसई पुरवठा कार्यालयातील अधिकारी यांनी तात्काळ निवडक दुकानदारांना त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवतात की, वाढीव धान्य घेऊन जा….वसई पुरवठा कार्यालयातील अधिकारी यांची शिधा वाटप दुकानदारांशी सेटिंग असून त्या दुकानदारांकडून त्यांना दरमहा हप्ता मिळतो. तसेच अधिकारी मर्जीतले पाच सहा रेशन दुकानदाराना किती कट्टे पाहिजे ? मग तुला दोनशे कट्टे पाहिजे असल्यास ड्रॉव्हर मध्ये पैसे टाक तुला कित्ती चारशे कट्टे टाक खना मध्ये पैसे आणि असे प्रकार चालू आहे ? आता जनतेला असा प्रश्न पडला आहे आम्ही कधी येऊ आणि आम्हाला कधी जास्तीचा माल भेटणार असे जनतेला प्रश्न पडत आहे म्हणून तसेच पुढच्या बातमी मध्ये लवकरच आम्ही मर्जीतले जे पाच सहा दुकान आहे त्याचे नाव लवकरच आम्ही जाहीर करणार आहेत तसेच
या गैरव्यवहारात वरिष्ठ अधिकारी व पुरवठा अधिकारी यांचा हात निश्चितच असेल, यात अजिबात शंका घेण्याचे कारण नाही. त्यामुळे अश्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी जनतेने जागरूक राहणे गरजेचे आहे त्यासाठी https://rcms.mahafood.gov.in/Portal/DistrictDetails.aspx या वेबसाईटवर जाऊन आपले आपल्या रेशन कार्ड चे (आर.सी ) नंबर टाकून बघावे आपल्या धान्य किती भेटत आहे अन्यथा आपल्या धान्याची काळाबाजारी होत तर नाही ना म्हणून आपण जागरूक राहण्याची पुन्हा गरज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *