नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहिर होईल : पालकमंत्री दादाजी भूसे

पालघर दि. 21 :- तोक्ते चक्रीवादळामुळे शेतपिकांचे, फळपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहिर करण्यात येणार असल्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वसई तालुक्यातील उंबरगोठण, तरीचा पाडा तसेच पालघर तालुक्यातील बहाडोली आदि गावांतील केळी, जाभूळ, या फळपिकांची, भाजीपाला शेतपिकांची पाहणी पालकमंत्री दादाजी भूसे यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार राजेंद्र गावीत, उपस्थित होते.

तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तिन जणांचा मृत्यू झाला तर तिन जण जखमी झाले आहेत. तसेच घरांचे नुकसान झाले असून विद्यूत खांब देखील पडलेले आहेत. या सर्व नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून हा सर्व अहवाल शासन पातळीवर देण्यात येईल. शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *