

वसई (प्रतिनिधी) – वसई विरार महानगरक्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, अवेळी पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांचे, मच्छीमारांचे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या वसई ग्रामीण भागातील जनतेचे पंचनामे अशा महत्वपूर्ण विषयांवर खासदार राजेंद्र गावित यांनी वसई प्रांत यांच्या दालनात विशेष बैठक घेतली. सदर बैठकीत वसईतील वाहतूक कोंडीसाठी वाहतूक पोलीस बळ वाढवणे, वसई ग्रामीण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे (अजूनही पंचनामे न केलेले), भातशेती, मीठशेती, मस्यशेती, फुलशेती, वनपट्टे आणि खाजगी वने यांचे पंचनामे करणे, शेतकऱ्यांस विमा योजनेत सहभागी करणे, वसई तालुका कृषी संमेलन घेणे, अतिक्रमण पथकाची कारवाई वेळ वाढवणे असे अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आणि पर्यायही उपलब्ध करून दिले, लवकरच या विषयावर अंबलबजावणी होईल, असे उपस्थित अधिकारी यांनी सांगितले. रेल्वे संदर्भातील तक्रारींसाठी मी लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठका घेईन, असेही खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले.
सदर बैठकीस वसईचे प्रांत स्वप्नील तायंडे, अति.आयुक्त रमेश मनाळे, पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील, मोटार पोलीस अधिकारी (वसई विरार), नायब तहसीलदार श्री.मुकणे, गायकवाड, वसई तालुका कृषी अधिकारी श्री.शिरसाठ, शिवसेना वसई तालुका प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, पालघर जिल्हा परिषद सदस्य चित्रा किणी, माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, वसई वि.स. समन्वयक हरिश्चंद्र पाटील, वसई शहरप्रमुख राजाराम बाबर, प्रथमेश राऊत, नगरसेविका शिल्पा सिंग, मिलिंद खानोलकर उपतालुका प्रमुख भगवान वझे, युवासेनेचे जयेश पाटील, सुनील मिश्रा उपस्थित होते.