अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या -रुपाली चाकणकर यांचे आवाहन

पालघर , दि. 09 मे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत पालघर जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी बुधवार दि.११/०५/२०२२ रोजी, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा – पालघर येथे सकाळी ११.३० वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा, श्रीमती रुपाली चाकणकर या स्वतः तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे. महिलांनात्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणी वेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसंच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना याउपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचं काम आयोगाद्वारे करत आहे. पालघर जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *