

जिल्ह्यातील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी ची कामे करावी लागतात यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा माता आरोग्य सुधारावे व त्याचबरोबर मातामृत्यू बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा यासाठी मात्रू जिल्ह्याभरात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवण्यात येणार आहे या योजनेमुळे सुदृढ बालकांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी केले आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आज पासून सुरु होणाऱ्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताह ‘आणि ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य२.० चे उद्घाटन आज ग्रामीण रुग्णालय पालघर येथे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले ,त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटनानंतर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. २ते ८ डिसेंबर या काळात राबवण्यात येणाऱ्या मातृवंदना सप्ताहाचे ‘आरोग्यदायी राष्ट्राची उभारणी- सुरक्षित जननी विकसित धरणी ‘ असे ब्रीदवाक्य असून या सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीबाबत, उद्दिष्टांबाबत, ग्रामसभा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या बैठका घेणे, जिल्ह्यामध्ये स्वयंसेवकांना मार्फत मॅरेथॉन किंवा प्रभात फेरीचे आयोजन करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व कार्यक्षेत्रामध्ये योजनेच्या माहिती पत्रकांचे वाटप करणे, कार्यक्षेत्रामध्ये लाभार्थ्यांसाठी महिला समुदायासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणे ऋतूनुसार फळे आणि भाज्या खाण्यासाठी चालना देणे आरोग्य पोषण व स्वच्छता इत्यादी संबंधित माहिती आधारित खेळांचे आयोजन करणे, प्रत्येक प्रा आ केंद्रामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लाभार्थी चे आधार कार्ड काढणे अपडेट करण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले आहे या व इतर अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे. ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य २.०’ या मोहिमेत मार्फत जिल्ह्यातील जोखीम ग्रस्त भागात 0 ते 2 वर्षापर्यंतच्या मुलांचा सर्वे करण्यात आला या सर्वेमध्ये जी मुले व गरोदर माता लसीकरणापासून वंचित राहिली आहेत अशा लाभार्थ्यांना या मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येणार असून जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरणाचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणार, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सूर्यवंशी यांनी दिली. या मोहीमेचा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी शिंदे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीश केळुस्कर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर, वैद्यकीय अधीक्षक ग्रा.रु. डॉ दिनकर गावित, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिजीत खंदारे ,जिल्हा कार्यक्रम समन्वयक वसुंधरा रूदनुरे, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक प्रसाद किणी व कर्मचारी उपस्थित होते.