मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ.रश्मी ठाकरे या दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाचे संपादकपद ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता सौ.रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक असणार आहेत. आजपासून त्यांच्याकडे हे पदाची जबाबदारी असणार आहे. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे.
सामनाची सुरुवात झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे संपादकपदी होते. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक राहिले. पण आता मुख्यमंत्री झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे संपादकपद सौ. रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. आजच्या सामनामध्ये संपादक सौ रश्मी ठाकरे असा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे त्या सामनाचं कामकाज कसं पाहतात हे बघण्याची उत्सुुकता सर्वसामान्य जनतेला आहे.
लाभाच्या पदावरून शंका उपस्थित होत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संपादकपद सोडलं. खरंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रश्मी ठाकरे या राजकारणात अॅक्टिव्ह दिसल्या. त्यामुळे त्या राजकारणात येणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. रश्मी ठाकरेंनी महिला आघाडीचं काम पाहिलं आहे पण त्या कधीच कोणत्याही पदावर नव्हत्या. पण आता त्यांना सामनाचं संपादकपद देण्यात आलं आहे. तर कार्यकारी संपादक म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत काम पाहत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *