वसई (प्रतिनिधी):- वसई तालुक्यातील सातिवलीतील राजदीप इंडस्ट्रीत अनधिकृतपणे बांधकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असून सदर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे, वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांकडे एका लेखी निवेदनाद्वारे तक्रादार यांनी तक्रार केली आहे.त्यानुसार, वसई विरार महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या सातिवली येथील मौर्यानका या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या शेजारीच राजदीप इंडस्ट्रियल नावाची कंपनी आहे.त्या कंपनीला अनधिकृत रित्या सुमारे दहा ते पंधरा फूट भिंत वाढवण्यात आली आहे. तर संपूर्ण कंपनीच्या सभोवताली अवैधपणे पत्र्याचे शेड टाकण्याच्या कामासह पहिल्या माळ्यावर अनाधिकारे पोटमाळा टाकण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.परंतु असे असतानाही वसई महापालिका सदर अनधिकृतपणे केलेल्या कंपनीच्या बांधकामावर जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा थेट आरोप तक्रार दाराने केला असून जर हे अनधिकृत बांधकाम गोर गरिबांनी केले असते तर त्याच्यावर वसई मनपाच्या संबंधित विभागाने सदरचे अनधिकृत बांधकामावर तात्काळ धडक कारवाई करून बांधकाम उध्वस्त केले असते.असा हवाला देत राजदीप इंडस्ट्रीतील संपूर्ण अनधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामावर तूर्तास तोडक कारवाई करावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे लावून धरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed