आयुक्तांची भूमिका संशयास्पद;कारवाई करण्याऐवजी पाठराखण करण्याचा प्रयत्न

नालासोपारा(प्रतिनिधी) -वसई विरार पालिका आयुक्त गंगाथरण डी. यांनी दी.३ नोव्हेंबर रोजी जारी केलेले पेल्हार प्रभागाच्या सहा.आयुक्त नीता कोरे यांच्या बदलीचे आदेश अचानक मागे घेतले आहे.आयुक्तांनी अचानक आदेश मागे घेत या प्रभागासाठी नियुक्त केलेल्या सुरेंद्र पाटील यांना विशेष नियोजन प्राधिकरण विभागाच्या सहा आयुक्त पदावर बदली केली आहे.वास्तविक आयुक्तांनी बदलीचे आदेश न मानणाऱ्या कोरे यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु बदलीचा आदेश रद्द केल्याने आयुक्तांच्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत.दैनिक महासागरनेही २५ नोव्हेंबर रोजीच्या अंकात बदलीचे आदेश न मानणाऱ्या सहा.आयुक्तावर आयुक्तच मेहेरबान? या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.दरम्यान काल नीता कोरे यांचे बदलीचे आदेश अचानक मागे घेतल्याने आयुक्त हे कोरे यांच्या वर मेहेरबान असल्याने स्पष्ट होत आहे.
पेल्हारच्या प्र.सहा आयुक्त पदी बोळींज विभागातील वरीष्ठ लिपिक निता कोरे यांची दि. ९ ऑक्टोबर रोजी वर्णी लावण्यात आली होती.दैनिक महासागरकडे प्राप्त झालेल्या माहिती नुसार पालिका आयुक्तांनी कोरे यांच्या बदली दी.३ नोव्हेंबर रोजी मुख्यालयात केली होती.त्यांच्या जागी सुरेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आले होते.परंतु नीता कोरे यांनी आदेश देऊन ही ही आपला पदभार सोडला नव्हता. या आदेशा ची प्रतही पेल्हार कार्यलयात १० नोव्हेंबर रोजी देण्यात आली होती. असे असतानाही नीता कोरे या मला आदेशाची प्रतच न मिळाल्याचा कांगावा करत सहा. आयुक्त पदाच्या खुर्चिला चिकटून बसल्या होत्या.विशेष म्हणजे पालिका आयुक्त गंगाथरण डी. हे स्थितीप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहेत
त्यामुळे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु आयुक्तांनी कोणतीही कारवाई न करता बदलीचे आदेशच मागे घेतले आहेत.

पेल्हार प्रभागात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सद्या ऐरणीवर आला आहे.
प्रभागात अनेक ठिकाणी बिनदिक्कत पणे अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत.त्याविरोधात त्यांनी अजूनपर्यंत ठोस कारवाई केलेली नाही.शिवाय स्वच्छता, रस्ते,पाणी असे अनेक प्रश्न या प्रभागातील नागरिकांना भेडसावत आहेत.परंतु कोरे यांनी पदभार स्वीकारल्या पासून त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.त्यातच आता नीता कोरे यांनी आयुक्तांच्या आदेशाचे पालन न करता पेल्हार विभागातच चिकटून राहणे पसंत केले आहे.एकप्रकारे वरीष्ठांच्या आदेशाला धाब्यावर बसवणार्‍या निता कोरे यांच्या या कारभारामुळे नाराजी व्यक्त होत आहे. अशा उर्मट अधिकार्‍यावर तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता असताना आयुक्तांकडूनच पाठराखण करण्यात येत आहे.ती पूर्णपणे चुकीची आहे.
-शमसुद्दीन खान(बहुजन महापार्टी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *