
नालासोपारा :- वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यरत कर्मचार्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना जागा देण्यात यावी अशी मागणी भाजपाचे मनोज बारोट यांनी मनपा आयुक्त अनिलकुमार पवार यांना केली आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिका ही चार नगरपालिका व ५३ गावांच्या ग्रामपंचायती मिळून बनलेली आहे. या ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या स्थापनेनंतर महापालिकेत समावेश करण्यात आला. मात्र दुर्दैवाने महापालिकेच्या स्थापनेला १३ वर्षे उलटून गेल्यानंतरही महापालिकेच्या आस्थापना विभागाच्या मनमानीपुढे ते उभे राहू शकले नाहीत, परिणामी अनेक कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढत सेवानिवृत्त झाले किंवा जगातून निघून गेले. तसेच आजही अनेक लिपिक वरिष्ठ लिपिकाची वाट पाहत बसले आहेत. मात्र आस्थापना विभाग कुंभकर्णाच्या निद्रेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काही वरिष्ठ लिपिकांना अधीक्षक करण्यात आले होते, मात्र लिपिकांना वरिष्ठ लिपिकाचे पद का देण्यात आले नाही ? महापालिकेच्या दुटप्पी धोरणामुळे आगामी काळात महापालिकेचे काम सांभाळता येणार नाही. कारण ग्रामपंचायत आणि नगरपालिकांमध्ये कार्यरत असलेले ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी येत्या दोन वर्षांत निवृत्तीच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे अनेक पदेही रिक्त आहेत. असे असले तरी लिपिक व इतर कर्मचाऱ्यांना योग्य जागा देऊन प्रशिक्षित न केल्यास आगामी काळात महापालिका प्रशासन चालवणे कठीण होणार आहे. त्यामुळे या गंभीर बाबीबाबत बारोट यांनी पालिका कर्मचारी व तालुक्यातील नागरिकांच्या भवितव्याचा विचार करून सर्व लिपिक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार पदोन्नती देऊन त्यांच्या कामाची जाणीव करून देण्याचे प्रशिक्षण सुरू करावे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्क मिळेल आणि महानगरपालिका चालवण्यासाठी सरकारवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
त्यामुळेच येत्या काळात किती कर्मचारी निवृत्त होणार आहेत, याची माहिती आयुक्तांनी आस्थापना विभागाकडून घ्यावी, अशी मागणीही बारोट यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच त्यांची जागा भरण्यासाठी महापालिकेकडे पात्र कर्मचारी आहेत की नाही? अन्यथा आस्थापना विभागाने कर्मचाऱ्यांबाबत केलेले दुर्लक्ष आगामी काळात महापालिका प्रशासन चालवण्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. ही बाब गांभीर्याने घेत तातडीने शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.