विरार (एस. रहमान शेख) – कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन झाल्यानंतर रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत आहेत, याच्या निषेधार्थ अनेक संघटना प्रवाशांकडून जास्त भाडे आकारत असल्याच्या निषेधार्थ निवेदनही देण्यात आले. पण तरीही हे रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत आहेत, एखाद्या प्रवाशाने रिक्षाचालकांना जास्त भाडे आकारण्यास विरोध केला, तर ते अधिक भाडे का घेत आहेत, असे सांगून विरार पोलिसांच्या हद्दीत फुलपाडा येथे रिक्षा चालकाने प्रवाशाला मारहाण करण्यात आली. या बातमीचा व्हिडिओ एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले तेव्हा रिपाइंचे युवा जिल्हाध्यक्ष शफिकुर रहमान यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी यांना कळवली व त्यांनी ताबडतोब ज्या व्यक्तीसोबत रिक्षाचालकांनी मारहाण केली त्या व्यक्तीला भेटण्यास सांगितले. तसेच 21 जानेवारी रोजी पीडितेसोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांना रिपाइंचे पदाधिकारी पालघर जिल्हा प्रवक्ते मन्सूर सरगुरोह.पालघर जिल्हा युवक अध्यक्ष, शफिकुर रहमान (जाजी), वसई विरार क्षेत्र युवा अध्यक्ष चंदन सिंग, विद्यार्थी आघाडीचे राहुल शिरसाट, महिला आघाडीचे प्रणाली कासाले, , सहजाद खान यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती विरार वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिली त्यांनी हे प्रकरण ऐकून घेतल्यानंतर अज्ञात रिक्षाचालकांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, पोलिसांच्या विविध कलमान्वये एफ.आय.आर नोंदवून घेतले व विरारच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी यांनी आश्वासन दिले की यापुढील काळात कोणत्याही प्रवाशासोबत अशी घटना घडणार नाही, असे कार्यकर्त्यांना सांगितले.तसेच युवा जिल्हाध्यक्ष शफिकुर रहमान यांनी सांगितले की सदेव अन्यायच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा लढा सुरूच राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *