

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगर पालिका प्रभाग समिती जी हद्दीत तसेच गोखिवरे तलाठी हद्दीत मधुबन येथे नैसर्गिक नाल्याला लागून अनधिकृतरीत्या माती भराव करून अवैध बांधकाम करण्यात आलेले असून सदरची अनधिकृत बांधकामे निष्कासित करून बांधकाम धारकांवर एमआरटीपी गुन्हे दाखल करण्याची मागणी युवा शक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी केली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगर पालिका प्रभाग समिती जी हद्दीत तसेच गोखिवरे तलाठी हद्दीत मधुबन येथे नैसर्गिक नाल्याला लागून भूमाफियांनी अवैध माती भराव करून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे केली आहेत. सदरची अनधिकृत बांधकामे धोकादायक असून प्रशासनाने त्वरित बांधकामे निष्कासित करून बांधकामधारकांवर एमआरटीपी गुन्हे दाखल करावेत. महानगरपालिका अधिकारी व महसूल प्रशासन अधिकारी यांच्या संरक्षणाशिवाय बांधकामे होणे अशक्य आहे. तक्रारी संदर्भात कारवाई करण्यास टाळाटाळ म्हणजे अधिकाऱ्यांकडून लाच खाऊन सदरच्या बांधकामांना संरक्षण होय. अनधिकृत बांधकामांची लाच मंत्रालयापर्यंत जात असून मंत्री, अधिकारी, लोक प्रतिनिधी यांच्या संरक्षणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. फार मोठा अंदाधुंद भ्रष्टाचार चालू आहे.