
वसई (प्रतिनिधी):
“वसई तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींनी माहिती अधिकाराच्या कायद्याला खुंटीला टांगलं आहे, आणि संबंधित माहिती व अपील अधिकारी यांचं वर्तन पाहता, ते देखील या भ्रष्ट साखळीचे भाग आहेत,” असा तिखट आरोप करत सामाजिक कार्यकर्ता/पत्रकार रूबिना मुल्ला यांनी दुसऱ्या अपीलची तयारी दर्शवली आहे.
“जर माहिती अद्यापही दिली गेली नाही, तर मी थेट सेकंड अपील दाखल करणार असून, या प्रकरणात कोकण विभागीय आयुक्तांनी लक्ष घालावं आणि योग्य न्याय द्यावा,” असा विश्वास व्यक्त करताच त्यांनी एकाच वेळी यंत्रणेवर घणाघात केला आहे.
झोपलेल्या अधिकाऱ्यांना झणझणीत इशारा!
“संबंधित माहिती अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी हे कायद्यापेक्षा मोठे झाले आहेत की काय? त्यांनी नागरिकांच्या हक्कांची खुली पायमल्ली केली आहे. आता दुसऱ्या अपील अधिकाऱ्यांनी — म्हणजेच कोकण आयुक्तांनी — तरी निष्पक्षता दाखवून हे प्रकरण गंभीरपणे घेतलं नाही, तर लोकशाही व्यवस्था ही केवळ नावापुरती उरली आहे, हेच सिद्ध होईल!”
दुसरा अपील म्हणजे शेवटचा इशारा!
रुबिना मुल्ला यांचा हा इशारा केवळ वैयक्तिक नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेला सवाल करणारा आहे. “जर दुसऱ्या अपीलमधून देखील अन्याय झाला, तर रस्त्यावर उतरून लढण्याशिवाय पर्याय उरणार नाही,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
मागणी काय?
– माहिती अधिकार कायद्याच्या कलमानुसार लवकरात लवकर माहिती द्यावी
– दोषी माहिती अधिकारी व अपील अधिकाऱ्यांवर IPC कलम 166, 167, 188, 217 व 218 अंतर्गत फौजदारी कारवाई करावी
– कोकण विभागीय आयुक्तांनी प्रकरणात तत्काळ लक्ष घालावे.
माहिती न दिलेल्या ग्रामपंचायतींची यादी:
१) अर्नाळा ग्रामपंचायत
२) भाताणे ग्रामपंचायत
३) चंद्रपाडा ग्रामपंचायत
४) कळंब ग्रामपंचायत
५) करंजन ग्रामपंचायत
६) खानीवडे ग्रामपंचायत
७) खोंचिवडे ग्रामपंचायत
८) माजीवली ग्रामपंचायत
९) माळजीपाडा ग्रामपंचायत
१०) मेंढे ग्रामपंचायत
११) पानजू ग्रामपंचायत
१२) पारोळ ग्रामपंचायत
१३) पोमन ग्रामपंचायत
१४) रांगाव ग्रामपंचायत
१५) सटपाळा ग्रामपंचायत
१६) सायवन ग्रामपंचायत
१७) शिवणसई ग्रामपंचायत
१८) तरखड ग्रामपंचायत
१९) टेंभी ग्रामपंचायत
२०) तिल्हेर ग्रामपंचायत
२१) तिवरी ग्रामपंचायत
२२) तोक्रे ग्रामपंचायत
२३) वासलई ग्रामपंचायत
“हक्क मागितल्यावर अधिकारी जर गुन्हेगारासारखं वागत असतील, तर ही लोकशाही नव्हे – ही एक भ्रष्ट साखळीची ‘राजवट’ आहे. कोकण आयुक्तांनी आता तरी कायद्याचा बडगा उचलावा!” — असा संतप्त आणि ठाम इशारा सामाजिक कार्यकर्ता/पत्रकार रूबिना मुल्ला यांनी दिला.