राजावली येथे शासकीय भूखंडावर पुन्हा अनधिकृत बांधकामे चालू ?

वसई(प्रतिनिधी) : पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील माणिकपूर मंडळ अधिकारी व गोखिवरे तलाठी क्षेत्रात गाव मौजे राजावली येथे शासकीय भूखंडावर पुन्हा अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून भूमाफियांनी महसूल प्रशासनशी संगनमत करून अनधिकृत बांधकामे करण्यास सुरुवात केली आहे! पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील माणिकपूर मंडळ अधिकारी व गोखिवरे तलाठी क्षेत्रात गाव मौजे राजावली येथे शासकीय भूखंडावर हजारोंच्या संख्येने अनधिकृत बांधकामे झाली आहेत. सदरच्या अनधिकृत बांधकामांना महसूल अधिकाऱ्यांचे संरक्षण लाभलेले आहे. अधिकारी लाच खाऊन अनधिकृत बांधकामांना संरक्षण देतात, शासकीय भूखंडावर अनधिकृत बांधकामे होतात आणि मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्या तरी कारवाई होत नाही यावरून भ्रष्टाचार किती भयंकर प्रकारे फोफावला आहे हे निदर्शनास येते.
शासकीय भूखंडावरील सदरच्या अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी महसूल प्रशासनाने कारवाई करायला हवी, मात्र बांधकामे चालू असताना लाच खाऊन महसूल अधिकारी स्वतःचे खिसे गरम करीत असतात. सदर भ्रष्टाचारात शासकीय प्रशासकीय अधिकारी, राजकीय , आणि लोकप्रतिनिधी ही निःसंशय सामील आहेत!राजावली येथे शासकीय भूखंडावर सध्या जी बांधकामे चालू आहेत त्या बांधकामांवर विना विलंब निष्कासन कारवाई करून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर एमआरटीपी व अन्य कलमान्वये फौजदारी कारवाई करावी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *