दातिवरे आंबेडकरनगर गावातील आपले समाजबांधव शिक्षक व बौद्धाचार्य आयु. रुपेश राऊत यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आज सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा ईशारा दिला.
रूपेश राऊत यांना आज अनेक वर्षापासून मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न सदर गावातील तथाकथित कंटकानी केला आहे. जाणून बुजुन जातीय मानसिकतेतुन डिवचन्याचे काम तेथील व्यवस्था करत आहे. काही प्रश्न विचारले आणि जाब विचारला म्हणून आयुष्यातुन उध्वस्त करण्याचा डावपेच तेथील काही मंडळी आखत आहेत. जातीय मानसिकतेतुन कोणती दुर्घटना घडू नये म्हणून पालघर जिल्हा अन्याय अत्याचार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब पालघर व पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मा. अविश राऊत (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष) , मा. सुरेश जाधव (ब.स.पा. पालघर जिल्हाध्यक्ष) , मा. सुरेश जाधव (रि.पा.ई पालघर जिल्हाध्यक्ष), मा. निलेश मोरे (बहुजन मुक्ती पार्टी पालघर जिल्हाध्यक्ष) , संदीप राऊत (वं.ब.आघाडी पालघर ता. अध्यक्ष) , मा. किरण गायकवाड (भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हाध्यक्ष) , मा. बिंबेश जाधव (दलित पँथर पालघर लोकसभा अध्यक्ष) , अॅड. अजिंक्य म्हस्के (दलित पँथर पालघर जिल्हा युवा अध्यक्ष) , मा. शरद जाधव (रि.पा.ई.पालघर ता. अध्यक्ष) विशाल मोहने (दलित पँथर कार्यकर्ता), मा. नितीन राऊत (बसपा कार्यकर्ता), मा. प्रीतम जाधव (बसपा कार्यकर्ता) व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *